ज्ञानदेवांपासून सुरु झालेल्या वारकरी संप्रदायाचे, एकनाथ (1533 – 1599) एक महत्वपूर्ण आणि विख्यात संत होते. त्यांचा जन्म 1533 च्या आसपास गोदावरी नदीच्या काठी पैठणात झाला होता. त्या काळात पैठण एक पवित्र स्थान होतं, ते संस्कृत अध्ययन आणि वेदाभ्यासाचं केन्द्र होतं.
एकनाथांच्या कवितालेखनाची शैली खूप सरळ व आकर्षक होती व त्यांनी मराठीत ऐहिक कविता सुरु केल्या.
एकनाथाने कोणचही काम हाती धरलं की त्यात त्यांची कीती चिकाटी असायची हे दर्शवणारी एक लहानशी कहाणी बघा.
एकदा गुरुदेवांनी एकनाथांना राजाच्या राज्यकाराभाराच्या खर्चाच्या हिशोबाच काम सोपवलं. हा हिशोब राजाला दूसर्या दिवशी सकाळी द्यायचा होता. हिशोब लिहिण्यात व तपासण्यात संपूर्ण दिवस गेला. रात्र झाली. एका सेवकानी मेणबत्ती पेटवून एकनाथांजवळ ठेवली व निघून गेला. एकनाथांना हे सुद्धा नाही कळलं की रात्र केव्हां झाली. त्या हिशोबा मधे कुठेतरी एक आण्याची चूक झाली होती. मध्यरात्र व्हायला आली पण त्या एक आण्याचा हिशोब काही सापडत नव्हता. एकनाथांच काम चालूच होत...
पहाट झाली व गुरुदेवांनी बघितल की एकनाथ अजून देखील त्या हिशोबी कामात गर्क होते. ते चुपचाप आले व त्या मेणबत्तीजवळ येऊन उभे राहिले. आता पुस्तकांवर त्यांची सावली पडू लागली, पण अजून ही एकनाथांच लक्ष पूर्णपणे हिशोबांतच होतं, ते एकचित्त हून काम करत होते. ते कामात एवढे गर्क होते की तेवढ्या अंधारात पण त्यांना खातेपुस्तकातील अक्षरं स्पष्ट दिसत होते.
आणि अचानक त्यांना एक आण्यांची चूक सापडली. एकनाथ एकदम खुश झाले व ओरडले: “मीळाली मीळली ती....!”
गुरुदेवांनी विचारले: “काय मिळालं, बेटा?”
एकनाथ गुरुदेवांची आवाज ऐकून एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांनी वर पाहिले, तेथे गुरुदेव उभे होते. ते उठले व गुरुदेवांना नमस्कार करून म्हणाले: “गुरुदेव! हिशोबात एक आण्याची चूक सापडत नव्हती. आता ती मिळाली.”
हजारोंच्या हिशोबा मधे फक्त एक आण्याची चूक! आणि त्या एक आण्याचा हिशोब मिळवण्यासाठी सबंद रात्र जागून काढणे. गुरु-सेवेतील एक अपूर्व समर्पण! एकनाथांच हे समर्पण व सबूरी बघून श्री जनार्दन स्वामींच हृदय भरून आलं. त्यांना सत्य-ज्ञानाच्या सुधारसाचा वर्षाव करण्यासाठी एक योग्य वारिस मिळाला. सद्गुरुंना मिळालेल्या आध्यात्मिक संपदेची राखणी करण्याकरिता योग्य आणि खरा शिष्य मिळाला.
त्यांचे गुरु श्री. जनार्दनस्वामींनी त्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले व त्यांना संस्कृत व्याकरण, तत्वज्ञान आणि वेदांत व इतर भक्तियोगांचे शिक्षण दिले. जनार्दन स्वामींनी त्यांना पंडित चंद्रोबांच्या ‘भागवत महापूराण’ च्या मूळ श्लोकांच संस्कृत मधून भाषांतर करण्यास सांगितले, म्हणजे साधारण माणूस त्यांना वाचण्याचा आनंद घेऊ शकतील, ‘चतुष्लोकी-भागवत’ हे ह्याच कामाचं परिणाम आहे, त्यांच सर्वप्रथम महत्वपूर्ण कार्य. ह्यात त्यांनी किर्तन, नामस्मरण व ध्यान ह्यांच महत्व काय आहे हे दाखवण्यावर जास्त जोर दिलेला आहे. त्यांनी संताच्या उदाहरणांनी भक्तिमार्गाच्या नव पारंपरिक अंगाचं (नवांगनी) सुंदर वर्णन केलं आहे.
एकनाथी भागवत हे खरोखरच मराठी साहित्यातील सुविख्यात ग्रंथ आहे. एकनाथांचे महाकाव्य लोकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन पुरे पाडतं.
“ ऐका जनार्दनी सोपा, विट्ठलनाम मंत्र जपा
(अर्थात्, एकनाथ म्हणतात, देवांच्या नावाचा जप चालू ठेवा) “
त्यांच्या इतर लेखनात, “हस्तमालक’, ‘शुष्काटक’, ‘आनंद लहरी’, ‘नाथ भागवत’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ व ‘भावार्थ रामायण’ ह्यांचा समावेश होतो. संत एकनाथानी जगाला ‘शांति संदेश’ दिला, त्यामुळे त्यांना ‘शांति ब्रह्मा’ नावानी पण ओळखण्यात येतं.
श्री एकनाथा ह्यांना मराठीशिवाय संस्कृत, अरेबिक, पर्शियन, उर्दु व हिन्दी ह्या सर्व भाषेंच ज्ञान होतं, पण संत एकनाथांच सर्व लेखनकार्य मराठी भाषेतच केलेल आहे.
श्री एकनाथांनी महाराष्ट्रातील सुरु केलेली चळवळ ‘वासुदेव संस्था’ नावानी प्रसिद्ध आहे. त्यात वासुदेवांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट द्यायची, लोकांच्या घरा समोर जाऊन उभे राहायचे व भजने म्हणून आध्यात्मिक संदेश फेलवायचे. त्यांनी गावोगावी जाऊन, विस्तृत पण अगदी सोप्या रीतीने भागवत धर्माचा फेलाव केला.
आध्यात्मिक ज्ञानाने विश्वाला जोडण्यार्या व्यक्तिच ते एक उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी गंगेत महासमाधि घेतली.
संता वाचूनिया नाम न ये हाता | साधने साधिता कोटी जाण||
जैसे कोतेवीण करणे संसार | साधनविचार व्यर्थ ठेवला||
-चांदोबा
एकनाथांच्या कवितालेखनाची शैली खूप सरळ व आकर्षक होती व त्यांनी मराठीत ऐहिक कविता सुरु केल्या.
एकनाथाने कोणचही काम हाती धरलं की त्यात त्यांची कीती चिकाटी असायची हे दर्शवणारी एक लहानशी कहाणी बघा.
एकदा गुरुदेवांनी एकनाथांना राजाच्या राज्यकाराभाराच्या खर्चाच्या हिशोबाच काम सोपवलं. हा हिशोब राजाला दूसर्या दिवशी सकाळी द्यायचा होता. हिशोब लिहिण्यात व तपासण्यात संपूर्ण दिवस गेला. रात्र झाली. एका सेवकानी मेणबत्ती पेटवून एकनाथांजवळ ठेवली व निघून गेला. एकनाथांना हे सुद्धा नाही कळलं की रात्र केव्हां झाली. त्या हिशोबा मधे कुठेतरी एक आण्याची चूक झाली होती. मध्यरात्र व्हायला आली पण त्या एक आण्याचा हिशोब काही सापडत नव्हता. एकनाथांच काम चालूच होत...
पहाट झाली व गुरुदेवांनी बघितल की एकनाथ अजून देखील त्या हिशोबी कामात गर्क होते. ते चुपचाप आले व त्या मेणबत्तीजवळ येऊन उभे राहिले. आता पुस्तकांवर त्यांची सावली पडू लागली, पण अजून ही एकनाथांच लक्ष पूर्णपणे हिशोबांतच होतं, ते एकचित्त हून काम करत होते. ते कामात एवढे गर्क होते की तेवढ्या अंधारात पण त्यांना खातेपुस्तकातील अक्षरं स्पष्ट दिसत होते.
गुरुदेवांनी विचारले: “काय मिळालं, बेटा?”
एकनाथ गुरुदेवांची आवाज ऐकून एकदम आश्चर्यचकित झाले. त्यांनी वर पाहिले, तेथे गुरुदेव उभे होते. ते उठले व गुरुदेवांना नमस्कार करून म्हणाले: “गुरुदेव! हिशोबात एक आण्याची चूक सापडत नव्हती. आता ती मिळाली.”
हजारोंच्या हिशोबा मधे फक्त एक आण्याची चूक! आणि त्या एक आण्याचा हिशोब मिळवण्यासाठी सबंद रात्र जागून काढणे. गुरु-सेवेतील एक अपूर्व समर्पण! एकनाथांच हे समर्पण व सबूरी बघून श्री जनार्दन स्वामींच हृदय भरून आलं. त्यांना सत्य-ज्ञानाच्या सुधारसाचा वर्षाव करण्यासाठी एक योग्य वारिस मिळाला. सद्गुरुंना मिळालेल्या आध्यात्मिक संपदेची राखणी करण्याकरिता योग्य आणि खरा शिष्य मिळाला.
त्यांचे गुरु श्री. जनार्दनस्वामींनी त्यांना आध्यात्मिक शिक्षण दिले व त्यांना संस्कृत व्याकरण, तत्वज्ञान आणि वेदांत व इतर भक्तियोगांचे शिक्षण दिले. जनार्दन स्वामींनी त्यांना पंडित चंद्रोबांच्या ‘भागवत महापूराण’ च्या मूळ श्लोकांच संस्कृत मधून भाषांतर करण्यास सांगितले, म्हणजे साधारण माणूस त्यांना वाचण्याचा आनंद घेऊ शकतील, ‘चतुष्लोकी-भागवत’ हे ह्याच कामाचं परिणाम आहे, त्यांच सर्वप्रथम महत्वपूर्ण कार्य. ह्यात त्यांनी किर्तन, नामस्मरण व ध्यान ह्यांच महत्व काय आहे हे दाखवण्यावर जास्त जोर दिलेला आहे. त्यांनी संताच्या उदाहरणांनी भक्तिमार्गाच्या नव पारंपरिक अंगाचं (नवांगनी) सुंदर वर्णन केलं आहे.
एकनाथी भागवत हे खरोखरच मराठी साहित्यातील सुविख्यात ग्रंथ आहे. एकनाथांचे महाकाव्य लोकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन पुरे पाडतं.
“ ऐका जनार्दनी सोपा, विट्ठलनाम मंत्र जपा
(अर्थात्, एकनाथ म्हणतात, देवांच्या नावाचा जप चालू ठेवा) “
त्यांच्या इतर लेखनात, “हस्तमालक’, ‘शुष्काटक’, ‘आनंद लहरी’, ‘नाथ भागवत’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ व ‘भावार्थ रामायण’ ह्यांचा समावेश होतो. संत एकनाथानी जगाला ‘शांति संदेश’ दिला, त्यामुळे त्यांना ‘शांति ब्रह्मा’ नावानी पण ओळखण्यात येतं.
श्री एकनाथा ह्यांना मराठीशिवाय संस्कृत, अरेबिक, पर्शियन, उर्दु व हिन्दी ह्या सर्व भाषेंच ज्ञान होतं, पण संत एकनाथांच सर्व लेखनकार्य मराठी भाषेतच केलेल आहे.
श्री एकनाथांनी महाराष्ट्रातील सुरु केलेली चळवळ ‘वासुदेव संस्था’ नावानी प्रसिद्ध आहे. त्यात वासुदेवांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट द्यायची, लोकांच्या घरा समोर जाऊन उभे राहायचे व भजने म्हणून आध्यात्मिक संदेश फेलवायचे. त्यांनी गावोगावी जाऊन, विस्तृत पण अगदी सोप्या रीतीने भागवत धर्माचा फेलाव केला.
आध्यात्मिक ज्ञानाने विश्वाला जोडण्यार्या व्यक्तिच ते एक उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी गंगेत महासमाधि घेतली.
संता वाचूनिया नाम न ये हाता | साधने साधिता कोटी जाण||
जैसे कोतेवीण करणे संसार | साधनविचार व्यर्थ ठेवला||
-चांदोबा